व्यक्तिच्या संपूर्ण कल्याणासाठी भगवंताचे नाम जपावे : भागवताचार्य व्यंकट महाराज बाभळगावकर
लातूर / प्रतिनिधी : लातूर तालुक्यातील हरंगुळ बु. येथील श्री शंभूमहादेव देवस्थान याठिकाणी शिवालय महिला भजनी मंडळाच्या वतीने आयोजित श्रीमद्भागवत कथा अमृतपान ज्ञानयज्ञ सोहळ्याला काल चैत्र शुध्द प्रतिपदा (गुढीपाडवा) मंगळवार, दि. 9 एप्रिल 2024 रोजी शुभारंभ पाडव्याच्या दिवशी झाला.
या श्रीमद्भागवत कथा अमृतपान ज्ञानयज्ञ सोहळ्याचा आज बुधवार दि. 10 एप्रिल रोजी दुसर्या दिवशी श्रीमद्भागवताचार्य हभप श्री व्यंकट थडकर महाराज बाभळगावकर यांनी भागवत कथेचा सारांश सांगताना असे सांगितले की, व्यक्तिच्या संपूर्ण कल्याणासाठी भगवंताचे नाम जपावे असे स्पष्ट केले. तसेच श्रीमद्भागवत कथेच्या सानिध्यात संपूर्ण समाजाचे कल्याण होते.
यावेळी त्यांनी अनेक सांसारिक प्रसंगाला श्रीमद्भागवत कथेतील उदाहरण देऊन त्यांनी सांगितले की प्रत्येक व्यक्तीने संसार करताना समाजातील दीन दुर्बलांना, दुर्लक्षितांना समाजाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी भागगवताचार्य व्यंकट थडकर महाराज बाभळगावकर यांच्या सोबत गायनाचार्य शाम गुरुजी मोरे, सिंथ व गायन महादेव मस्के गुरुजी तबलावादक कल्याणजी पवार साई यांची यावेळी साथ संगत लाभली.
यावेळी कैलास नगर, सदाशिव नगर, काशिनगर, गायत्री नगर, अभिजात भैय्या देशमुख नगर आणि हरंगुळ बु. परिसरातील अनेक भाविक यावेळी उपस्थित होते.