लातूर लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार डॉ. शिवाजी काळगे नेमके कोण आहेत?
♦ लोकसभा निवडणुक काँग्रेस पक्षाला नवसंजीवनी देणारी ठरणार का?
लातूर : लातूर लोकसभा मतदार संघासाठी महाविकास आघाडीतील घटक पक्ष काँग्रेसकडून ज्यांना उमेदवारी जाहीर झाली आहे ते डॉ. शिवाजी बंडप्पा काळगे नेमके कोण आहेत? त्यांचा व्यवसाय काय आहे? ते कोणत्या गावचे आहेत? याबाबत नागरिकांमध्ये उत्सुक्ता आहे.
अरुण जि. हांडे (संपादक. जननेता)
लोकसभा निवडणुक जाहीर झाल्यानंतर भाजपाने विद्यमान खासदार सुधाकर श्रृंगारे यांना उमेदवारी देऊन त्यांच्यावर विश्वास दाखवला. याउलट काँग्रेस आपला उमेदवार देताना सगळ्यांचीच उत्सुक्ता शिगेला पोहचवली होती. अखेर दिल्लीतून महाविकास आघाडीकडून लातूर लोकसभेसाठी डॉ. शिवाजी काळगे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आणि सर्वांच्याच तर्कवितर्कांना पुर्णविराम भेटला. काँग्रेसकडून उमेदवारी मिळवत लातूर लोकसभा लढवणारे डॉ. शिवाजी काळगे नेमके कोण आहेत. याबाबत सविस्तर वाचा.
लातूर लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून ज्यांना उमेदवारी जाहीर झाली त्यांचे पुर्ण नाव डॉ. शिवाजी बंडप्पा काळगे आहे. डॉ. शिवाजी काळगे हे शेकापचे राज्य स्तरावरील ज्येष्ठ नेते भाई बंडप्पा काळगे यांचे चिरंजीव आहेत. डॉ. शिवाजी काळगे हे (एमबीबीएस) नेत्रतज्ञ आहेत. लातूर शहरात त्यांचे लक्ष्मी नेत्रालय या नावाने रुग्णालय आहे. लातूर जिल्ह्यासह आजूबाजूच्या राज्यात ही त्यांचा डोळ्याचे चांगले डॉ. म्हणून नाव लौकीक आहे. डॉ. शिवाजी काळगे हे राणी अंकुलगा ता. शिरुर अनंतपाळ येथील रहिवाशी असुन त्यांचे प्राथमिक शिक्षण गावातच म्हणजे राणी अंकुलगा यंथे झाले, माध्यमिक शिक्षण श्री देशीकेंद्र येथे तर उच्च माध्यमिक शिक्षण राजर्षी शाहू महाविद्यालय, वैद्यकीय शिक्षण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संभाजी नगर येथे झाले आहे. ते मालाजंगम (अ.जा.) आहेत. विविध संघटनावर पदाधिकारी-सदस्य म्हणुन ही डॉ. शिवाजी काळगे हे कार्यरत आहेत.
लातूर लोकसभा निवडणुक ही भाजपासाठी वनवे होईल, कॉग्रेसला उमेदवार भेटत नाही या सर्व चर्चाना पुर्णविराम मिळाला आहे. घरातूनच सामाजिक कार्याचा वारसा लाभलेले नेत्रतज्ञ डॉ. शिवाजी बंडप्पा काळगे यांच्या माध्यमातून काँग्रेसने भाजपा समोर आता तगडे आव्हाण उभे केले आहे अशी चर्चा नागरिकांत होत आहे. यावेळी काँग्रेसने स्थानिक उमेदवार तर दिलाच आहे शिवाय जातीय समिकरणात ही फिट बसणारा तोडीस तोड उमेदवार दिला असल्याची चर्चा राजकीय जानकार करत आहेत.
दरम्यान भाजपाने फोडा – फोडीचे राजकारण करत अनेकांना आपल्या पक्षात समावून घेतले असताना व अनेकांना प्रवेशासाठी चुचकारले असताना लातूरचे देशमुख मात्र पक्षासोबत निष्ठेने राहिले. देशमुखांच्या कुटूंबाचे नाव संपुर्ण महाराष्ट्रात अदबीने घेतले जाते त्याचे कारण स्व. विलासराव देशमुख यांचे व्यक्तीमत्व व त्यांना राजकारणात सुरुवातीपासुन सावली सारखी साथ देणारे त्यांचे बंधु दिलीपराव देशमुख, काका-पुतण्याचे नाते, भावा-भावाचे नाते संबंध. याबरोबरच राजकारणात राहूण ही त्यांनी जपलेली पक्षासोबतची निष्ठा.
अनेक दिग्गज काँग्रेसचा हात सोडून भाजपावासी झाल्यानंतर आ. अमित देशमुख यांना खऱ्या अर्थाने मुख्यमंत्री म्हणुन प्रोजेक्ट करायचे असेल तर येथील काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी-कार्यकत्यांना एक दिलाने काम करुन लोकसभेत डॉ. काळगे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणावे लागणार आहे. हि निवडणुक जरी लोकसभेची असली तरी आगामी विधानसभा व त्यासोबत येणाऱ्या सर्व निवडणुकांची रंगीत तालीम ठरणार आहे.
वरील सर्व बाबींचा सखोल विचार करता काँग्रेसला आता अंग झटकून कामाला लागावे लागेल व महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसचा लातूर बालेक्कीला आहे हे पुन्हा एकदा सिध्द करुन दाखवावेच लागेल. डॉ. शिवाजी काळगे यांच्या विजयाची पताका फडकविण्यात व काँग्रेसला आलेली मर्गळ दुर करुन काँग्रेसला नवसंजीवनी देण्यात लातूरचे नेतृत्व यशस्वी ठरते का ते पहाणे रंजक ठरणार आहे.