स्वामी विवेकानंदांच्या स्वप्नातील “विश्वशांती विद्यापीठ, पुणे”चे संस्थापक, विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ कराड ३ फेब्रुवारी २०२४ रोजी माईर्स एमआयटी या शिक्षण समुहाचे संस्थापक अध्यक्ष, विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांच्या वयाला ८३ वर्षे पूर्ण होऊन ते ८४ व्या वर्षात पदार्पण करत आहेत. रामेश्वर (रुई) जि. लातूर सारख्या एका खेड्यातून व सामान्य शेतकरी कुटुंबातून आलेल्या प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांचा शैक्षणिक प्रवास स्तिमित करणारा आहे. देशातील पहिल्या विश्वशांती विद्यापीठाची त्यांनी स्थापना केली. भारतमातेचा चेहरा बदलणारे, स्वामी विवेकानंदाना अभिप्रेत असणारे युवक, या संस्थेत घडत आहेत. ज्येष्ठ शिक्षणतज्ञ डॉ. एस. एन. पठाण यांनी सदर लेखात घेतलेला हा आढावा.
प्रा. डॉ. विश्वनाथ दादाराव कराड दूरदर्शी नेतृत्व
प्रा. डॉ. विश्वनाथ दादाराव कराड, एक निगर्वी विद्याथिप्रिय प्राध्यापक, कुशल प्रशासक, दूरदर्शी व्यक्तिमत्त्व, त्यांनी १९८३ साली माईर्स एम.आय.टी. या संस्थेची पुणे येथे स्थापना केली व १९९६ साली ‘विश्वशांती केंद्रा’ची स्थापना करून विविध सभा-परिषदांचे देशात व परदेशात आयोजन केले. डॉ. विश्वनाथ कराड मूळचे हाडाचे वारकरी. त्यांच्या कल्पनेतून आणि तळमळीमधून इंद्रायणीतीरी दगडी भक्कम घाट बांधले गेले व आळंदी आणि देहू या तीर्थक्षेत्रांना ‘ज्ञानतीर्थ क्षेत्र’ म्हणून ओळख मिळाली. १९९८ साली युनेस्कोने त्यांना जगामध्ये शांतीचा प्रसार करण्यासाठी अध्यासन बहाल केले. सदैव गुणवत्तेचा ध्यास, सर्वच महाविद्यालये/संस्थांना नॅकचे ‘ए’ क‘माकांचे मूल्यांकन, तर सर्व महाविद्यालय/संस्थांना एन.बी.ए.चे मानांकन लाभलेला हा शैक्षणिक परिसर. सर्व महाविद्यालयांच्या इमारती, रचना, बांधकाम हे प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांच्या संकल्पनेतून आणि चिंतनातून व प्रत्यक्ष कृतीतून साकार झाल्या आहेत. संस्थेसाठी रात्रंदिन झटणारे असे हे दूरदर्शी नेतृत्व संस्थेला लाभले आहे.
शैक्षणिक वातावरणाचा आदर्श वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे चा सुंदर परिसर
पुणे शहराच्या पश्चिमेला कोथरूड या उपनगरात हिरव्यागार वृक्षराजींनी नटलेल्या दोन टेकड्यांच्या कुशीत माईर्स एम.आय.टी. या शैक्षणिक संस्थेचा परिसर कुणालाही लगेचच मोहित करेल असा सजलेला आहे. रोमन व भारतीय संस्कृतीची शिल्पकलाकृती सांगणार्या भव्य इमारती, रॉयल पामची झालर, लॉन्स आणि अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने वागणारे हजारो तरुण-तरुणी. या विद्यार्थ्यांशी बोलताना असे जाणवते की, जगप्रसिद्ध एम.आय.टी. या संस्थेचेच ते विद्यार्थी आहेत, हा भावार्थ त्यांच्या चेहर्यावरून जणू ओसंडत असतो. प्राचीन वारसाहक्क सांगेल अशा प्रकारची सुंदर दगडी प्रशासकीय इमारत, त्यावरील घुमट (डोम) आणि त्यापुढे संत ज्ञानेश्वरांची मूर्ती हे एम.आय.टी. संस्थेचे जणू स्थापत्य ब‘ँडच झाले आहे. याच प्रशासकीय इमारतीमध्ये प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांचे मु‘यालय आहे.
भारतीय संस्कृतीच्या चिरंतन मूल्यांचा अंतर्भाव
२१व्या शतकामधे जगावर विज्ञान, माहिती तंत्रज्ञान आणि विविध माध्यमे, दूरदर्शन, अनेक वाहिन्या
यांचे जणू आक‘मणच झालेले आहे आणि याचे काही दृष्य प्रतिकूल परिणामही दिसू लागले आहेत. जे जे
पाश्चिमात्य आहे तेच उत्तम आहे, अशा प्रकारचा विचार तरुणांच्यामध्येे बळावतो आहे. पाश्चिमात्यांच्या
चालीरीतींचे अंधानुकरण फार मोठ्या प्रमाणावर आज तरुण पिढीमध्ये दिसते, यामुळे प्रा. कराड सर व्यथित
होतात. तरुणांच्यामधे भारतीय अस्मितेचा जागर करावयास हवा हे आता त्यांनी ठरवून टाकले आहे. भारतीय
संस्कृतीची मूल्ये विद्यार्थ्यांनी समजून घेतली पाहिजे व त्याप्रमाणे त्यांच्यावर संस्कार झाले पाहिजे, यासाठी
प्रा. डॉ. कराड सर सतत आग‘ही असतात. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्यदेवो भव व अतिथीदेवो भव ही
भारतीय संस्कृतीची मु‘य अशी चिरंतन विश्वात्मक मूल्ये आहेत. भारतीय तरुणांमध्ये हे रुजविण्यासाठी स्वतंत्र
विभाग सदर विद्यापीठात कार्यान्वित करण्यात आलेला आहे. यासाठी ‘संचालक, सामाजिक शास्त्रे व
मूल्याधिष्ठित शिक्षण’ यासाठी अनुभवी प्राध्यापकाची विद्यापीठात नेमणूक करण्यात आली आहे.
वैश्विक मूल्याधिष्ठित शिक्षण आणि यशस्वी व्यक्तिमत्त्वविकास
वैश्विक मूल्याधिष्ठित शिक्षण आणि यशस्वी व्यक्तिमत्त्वविकास’ ही राज्यस्तरावर हायस्कूलच्या
विद्यार्थ्यांसाठी स्वायत्त प्रमाणपत्र परीक्षा दरवर्षी जानेवारी महिन्याच्या पहिल्या किंवा दुसर्या रविवारी
घेतली जाते आणि त्यासाठी विद्यार्थ्यांना दिली जाणारी लाखो रुपयांची बक्षिसे हे सर्व पाहिल्यानंतर भारतीय
अस्मिता तरुणांच्यामध्ये जागविण्याचा प्रा. डॉ. कराड सर यांनी ध्यास घेतला आहे असेच म्हणावे लागेल.
विद्यापीठाच्या अभ्यासक‘मात या प्रगत अभ्यासक‘माचा समावेश करण्यात आला आहे. रामेश्वर (रूई), ता.
जि. लातूर या त्यांच्या जन्मगावी श्रीराम मंदिर, जामा मस्जिद, ह. जैनुद्दीन चिश्तींचा दर्गा, श्रीराम-रहीम सेतू
आणि तथागत गौतम बुद्ध विहार बांधून त्यांनी जणू रामेश्वर (रूई) येथे मानवतातीर्थच स्थापन केले आहे. या
सर्व स्थळांना विश्वशांती विद्यापीठाची प्रयोगशाळाच म्हणावी लागेल. प्रा. डॉ. कराड सरांच्या या सांप्रदायिक
सद्भावाच्या कार्यामुळेच त्यांना अमेरिकेत युटा प्रांतातील ‘सॉल्ट लेक’ येथे भरलेल्या नवव्या जागतिक
धर्मसंसदेत प्रमुख भाषण देण्यासाठी २०१५ मध्ये निमंत्रित करण्यात आले होते.
१० वर्षांनंतर विश्वशांती विद्यापीठाचे स्वप्न साकार
दि. २ जानेवारी २००७ रोजी युनेस्को पॅरिस या आंतरराष्ट्रीय परिषदेत प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांनी
तत्कालीन भारताचे मनुष्यबळ विकास मंत्री यांचेमार्फत भारतात विश्वशांती विद्यापीठ सुरू करावे असा
प्रस्ताव दिला होता. २०१७ रोजी तब्बल १० वर्षांनी का होईना प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांचे स्वप्न प्रत्यक्षात
आले आणि महाराष्ट्र शासनाने ‘प्रा. डॉ. विश्वनाथ कराड वर्ल्ड पीस विद्यापीठास’ मान्यता
दिली. ए.डी.टी. विद्यापीठाच्या परिसरात (लोणी काळभोर, पुणे) त्यांनी बांधलेला संत ज्ञानेश्वर –
तुकाराम महाराज विश्वशांती सभागृह
जगातील सर्वात मोठा घुमट म्हणून त्यास जागतिक स्तरावर मान्यता मिळाली आहे. हा घुमट म्ह
णजे "अध्यात्म शास्त्राची वैज्ञानिक प्रयोगशाळा" अर्थात मानवता भवन ही मा. डॉ. कराड सरांची
जगाला सर्वात मोठी देणगी आहे.
स्वामी विवेकानंदांच्या स्वप्नातील विद्यापीठ
हे सर्व पाहिल्यावर असे वाटते की, जणू विश्वशांती वर्ल्ड पीस विद्यापीठाच्या रूपाने पुणे येथे स्वामी
विवेकानंदांच्या स्वप्नातील विद्यापीठच साकार झाले आहे. शिकागो येथील सर्वधर्म परिषदेच्या अभूतपूर्व
यशानंतर स्वामी विवेकानंद भारतीय युवकांना आवाहन करताना तेव्हा म्हणाले होते की, “भारत पुन्हा उठेल-
संदेहच नाही, पण जडाच्या शक्तीने नव्हे तर चैतन्याच्या शक्तीने विनाशाचा झेंडा नाचवून नव्हे, तर शांती-
प्रेमाची पताका फडकवीत…” म्हणजेच वैराने नव्हे तर सद्भावाने. पुढे स्वामीजी स्पष्टच म्हटले होते की,
“रामकृष्णांच्या चरणस्पर्शाने जे मूठभर तरुण घडविले गेलेले आहेत… सध्या ते वीस आहेत. उद्या त्यांची सं‘या
दोन हजार करून सोडा…” स्वामीजींचे ते बोल कसे सत्यात आले पहा. रामेश्वर (रुई) या एका अत्यंत खेड्यातून
आलेला विश्वनाथ कराड नावाचा एक मुलगा आपल्या इंजिनिअरिंग विषयाची पुस्तके पुणे येथील आप्पा
बळवंत चौक येथे घेण्यासाठी जातो व योगायोगाने आठ आणे किमतीचे ते “ढर्हीीशिरज्ञ तर्ळींशज्ञरपरपवर”
हे छोटेखानी पुस्तक त्याच्या हाती पडते व हा युवक पुढे स्वामीजींचा पक्का शिष्यच होतो. जीवनभर तो
स्वामींजींचे तत्त्वज्ञान घेऊन जगतो व भारतातील एकमेव विश्वशांती विद्यापीठाची स्थापना करतो आणि
स्वामीजींचे तत्त्वज्ञान आपल्या प्रत्यक्ष कृतीने जगापुढे ठेवतो.
या विश्वशांती विद्यापीठातून आता १०,००० आदर्श विद्यार्थी तयार होत आहेत. पुढे ते १ लाख
होतील आणि या विश्वशांती विद्यापीठाच्या माध्यमातून स्वामीजींचे सद्भावनेचे, प्रेमाचे एकात्मतेचे तत्त्वज्ञान
स्पष्टपणे जगापुढे येईल, हा केवळ योगायोग नाही.
लेखक – डॉ. एस. एन. पठाण
माजी कुलगुरु,
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर