जाती – धर्मापेक्षा देशहित महत्वाचे : क्रीडा मंत्री संजय बनसोडे
महायुतीचा उमेदवार मताधिक्याने विजयी होणार
उदगीर/प्रतिनिधी : देशाच्या विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साथ देण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी घेतला आहे. विरोधक जाती – पातीचे राजकारण करत आहेत. पण जाती -धर्मापेक्षा देशहित महत्वाचे आहे. त्यामुळे आपण सर्वांनी जात- धर्म न पाहता देशहिताचा विचार करावा आणि त्यासाठीच भाजपा महायुतीचे उमेदवार सुधाकर श्रृंगारे यांना मतदान करुन विजयी करावे, असे आवाहन क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी केले.
उदगीर तालुक्यातील विविध गावांत महायुतीचे उमेदवार सुधाकर श्रृंगारे यांच्या प्रचारार्थ सरपंच, उपसरपंच, चेअरमन व महायुतीच्या प्रमुख पदाधिकार्यांच्या बैठकीत ना. बनसोडे बोलत होते.
यावेळी माजी आ. गोविंदराव केंद्रे, माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे, तालुकाध्यक्ष बालाजी भोसले पाटील, विधानसभा अध्यक्ष प्रवीण भोळे, शहराध्यक्ष सय्यद जानीमियाँ, प्रा.डॉ.श्याम डावळे, माजी नगरसेवक फय्याज शेख, अनिल मुदाळे, इम्तियाज शेख, ब्रम्हाजी केंद्रे, संगम आष्टुरे, नागेश थोंटे आदीसह मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना ना. संजय बनसोडे म्हणाले की, मतदार संघातील जिल्हा परिषद सर्कलनुसार बैठका घेणार असुन त्याच अनुषंगाने हाळी – हंडरगुळीत पहिली बैठक घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील प्रत्येक घटकापर्यंत विविध योजना पोहचविल्या. मागील 10 वर्षाच्या काळात सर्वसामान्य घटकांचा विकास अतिशय वेगाने झाला. नरेंद्र मोदी यांचे देशाला विकसित करण्याचे स्वप्न असुन आपण सर्वांनी साथ दिली तर ते निश्चितच पूर्णात्वास जाईल असा विश्वास आहे. आपण सर्वांनी एकत्र येवून नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी महायुतीचे उमेदवार सुधाकर श्रृंगारे यांनाच मतदान करावे, असे आवाहन ना. बनसोडे यांनी केले.
याप्रसंगी माजी उपसभापती बाळासाहेब मरलापल्ले, वसंत पाटील, गणेश गायकवाड, इब्राहिम देवर्जनकर, उदय ठाकुर, बालाजी देमगुंडे, प्रभाकर पाटील, रामकिशन जाधव, देविदास गुरमे, विकास मुसणे, संजीव केंद्रे, अजय गौशटवार, ज्ञानेश्वर भांगे, शुभम केंद्रे, धोंडीबा डावळे, दामोदर पाटील, लक्ष्मण डावळे, प्रभाकर डावळे, दिगंबर कुंडगीर, हणमंतराव डावळे, पंढरी पाटील, विश्वनाथ पाटील, दिगंबर पाटील, तानाजी डावळे, रामदास सुळे, रऊफ शेख, लक्ष्मण पाटील, संजीव हुंजे, बापूराव सुरवसे, बालाजी गायकवाड, धनाजी डावळे, नवनाथ मालवणे, शिवाजी माने, सुनिल कांवडे, माधव वडारे, संभाजी भालमारे, अमिर पठाण, आदीसह डाऊळ, हिप्परगा, खेर्डा, गुर्ती, वाढवणा, देऊळवाडी, घोणसी, हकनकवाडी, एकुर्का, इस्मालपुर, कल्लुर, गुडसुर, बोरगाव, वाढवणा खु., हंडरगुळी, नावंदी आदी भागातील प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.