देशाच्या भविष्याच्या दृष्टीने ही निवडणूक महत्त्वाची डॉ. काळगे यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे रहा – माजी मंत्री आ. अमित देशमुख
लातुर लोकसभा निवडणूक पार्श्वभूमीवर महापूर येथे माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या उपस्थितीत सुसंवाद बैठक संपन्न
प्रतिनिधी : बुधवार दि. २७ मार्च २०२४ लातूर लोकसभा निवडणूकीत डॉ. शिवाजी काळगे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. ही निवडणुक अतिशय महत्त्वाची असून लातुर सोबतच महाराष्ट्र आणि देशाच्या भविष्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची आहे, यासाठी सुशिक्षित, उच्चविद्या विभूषित, सुसंस्कृत, दृष्टीदाता डॉ. शिवाजी काळगे यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहायचे हे आपण ठरवावे असे आवाहन राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूरचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी केले
लातुर तालुका पंचायत समिती सर्कल मधील महापूर या ठिकाणी बुधवार दि. २७
मार्च रोजी दुपारी मल्लिकार्जुन भांगे यांच्या निवासस्थानी सुसंवाद बैठक
पार पडली या प्रसंगी ते बोलत होते. याबैठकीस महापूरसह नांदगाव, बोरवटी,
खुलगापूर, कासारखेडा, मळवटी, कोळपा याठिकाणचे ग्रामस्थ लातूर शहर व
जिल्हा काँग्रेसचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.
यावेळी बोलताना माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख म्हणाले की,
लोकसभा निवडणूक जाहीर करण्यात आली आहे, आणि या निवडणुकीत डॉ. शिवाजी
काळगे आपले महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. ही निवडणुक अतिशय महत्त्वाची
असून या निवडणूका लातुर सोबतच महाराष्ट्र आणि देशाच्या भविष्याच्या
दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या आहेत. आपले मत घेऊन आपल्याकडे वळून देखील न
पाहणाऱ्या उमेदवाराच्या मागे रहायचे की सुशिक्षित, उच्चविद्या विभूषित,
सुसंस्कृत, दृष्टीदाता डॉ. शिवाजी काळगे यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे
राहायचे हे आपण ठरवावे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, डॉ. शिवाजी काळगे हे २४ बाय ७ नाही तर ३६५
दिवस ५ वर्ष आपल्या संपर्कात राहणारे महाविकास आघाडी काँग्रेस पक्षाचे
उमेदवार ते आहेत. या उमेदवारीचे स्वागत सर्वस्तरावर मतदारसंघात होत आहे
ही आपली जमेची बाजू आहे. यामुळे आपले आपआपसातील गट तट विसरुन या
उमेदवाराला आपण घराघरात पोहचवावे लागेल यासाठी आपण आजपासूनच कामाला
लागावे असे आवाहन त्यांनी केले. आजची राज्यातील परिस्थिती आपण पाहता
ज्यामुळे जनतेच्या मनात प्रचंड चीड निर्माण झाली असून राज्यातील मतदार
मतदानाची वाट पहात आहेत आणि मतदान झाल्यावर महाविकास आघाडीचे सर्व
उमेदवार निवडून येतील यात अजिबात शंका नाही. यासाठी आपण आपल्या मतदार
संघातील उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहावे
असेही आवाहन माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी यावेळी केले.
यावेळी बोलताना डॉ. शिवाजी काळगे म्हणाले की, माझी उमेदवारी जाहीर
करण्यात आल्या नंतर आपल्याशी परिचय करून देण्यासाठी या बैठकीचे आयोजन
केले आहे. काँग्रेस पक्षाला उज्वल परंपरा असून आपल्याला या लोकसभा
निवडणुकीत काँग्रेसची जागा प्रचंड मताधिक्क्याने निवडून आणावी यातूनच
आपल्या पक्ष नेतृत्वाचे हात बळकट होतील, आणि आपल्याला या वेळेस केवळ
लढायचे नसून जिंकायचे आहे ही खूनगाठ बांधून येथून जायचे आहे. या बैठकीचे
प्रस्ताविक करताना पंडित ढमाले यांनी सर्कल मधील काँग्रेस पक्षाचे काम,
बूथ प्रमुख नियोजन याची माहिती देत पक्षाच्या मागे राहुन उमेदवार डॉ.
शिवाजी काळगे यांना निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केला. शेवटी सुसंवाद
बैठकीस उपस्थित सर्वांचे आभार रमेश माने यांनी मानले.
यावेळी लातुर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख, सरपंच कल्पना माने, लातुर शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष किरण जाधव, तालुका अध्यक्ष सुभाष घोडके, चेअरमन श्याम भोसले, सर्जेराव मोरे, बाजार समिती उपसभापती सुनील पडिले, संदीप माने, उत्तम कुलकर्णी, विकास चोथवे, रमेश माने, तुळशीराम भोसले, पंडित ढमाले यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.