डॉ. शिवाजी काळगे यांची निलंगा येथील दादापीर दर्ग्यास भेट ; मजारे शहीदवर केली चादर अर्पण
लातुर प्रतिनिधी : लातूरचा सर्वांगिण विकास हवा असेल तर डॉ. शिवाजी काळगे यांना दिल्लीत पाठवावे लागेल, आपले प्रश्न सोडवण्यासाठी डॉ. शिवाजी काळगे कटिबद्ध राहतील असे आवाहन आ. अमित देशमुख यांनी केले.
लोकसभा निवडणूक प्रचारा दरम्यान निलंगा दौऱ्यावर असताना निलंगा येथील दादापीर दर्ग्यास भेट दिली.यावेळी मजारे शहीदचे दर्शन घेऊन चादर अर्पण केली. दरम्यान आ. अमित देशमुख आणि सज्जाद ए दादापिर यांनी विविध विषयांवर चर्चा केली.