लातूर प्रतिनिधी : शहरातील जुना औसा रोड परिसरातील सद्गुरुनगरमधील श्री कालिकादेवी मंदीरातील श्री कालिकादेवी मातेची आरती विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांच्या हस्ते पारंपरीक पध्दतीने करण्यात आली. यावेळी डॉ. सारिका देशमुख, सौ. जुईली गणेश देशमुख, गणेश देशमुख, माजी नगरसेवक राम कोंबडे, सौ. प्रज्ञा राम कोंबडे, मंदीर समितीचे दीपक दिक्षीत, मुरलीधर दिक्षीत, प्रा. श्रीहरी वेदपाठक, अमोल दैठणकर, प्रदीप अपचुंदेकर, विवेक पंडित, प्रकाश महामुनी, अरुण बारस्कर, शशीकांत खर्डेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
सद्गुरुनगरमध्ये श्री कालिकादेवी मातेचे मंदीर आहे. सर्व भाविक, भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या या मंदीरातील श्री कालिकादेवी मातेची आरती विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांच्या हस्ते दि. १९ आॅक्टोबर रोजी रात्री ८.३० वाजता करण्यात आली. यावेळी डॉ. सारिका देशमुख, सौ. जुईली गणेश देशमुख, गणेश देशमुख, माजी नगरसेवक राम कोंबडे, सौ. प्रज्ञा राम कोंबडे, मंदीर समितीचे दीपक दिक्षीत, मुरलीधर दिक्षीत, प्रा. श्रीहरी वेदपाठक, अमोल दैठणकर, प्रदीप अपचुंदेकर, विवेक पंडित, प्रकाश महामुनी, अरुण बारस्कर, शशीकांत खर्डेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्री कालिकादेवी मातेच्या आरतीनंतर विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांच्यासह सर्व पाहूण्यांचे अमृता दैठणकर, सरीता दिक्षीत, प्रतिभा अपचुंदेकर, मीना बारस्कर, रवी पोतदार, अमोल दैठणकर यांनी स्वागत केले.
यावेळी बोलताना विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांनी सर्व भाविक, भक्तांना शारदीय नवरात्र महोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच मंदीर विकासासंदर्भात जे काही काम असेल ती सर्व कामे माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख पुर्ण करतील, ते सदैव आपल्या सोबत आहेत. आपणही त्यांना कायम आशिर्वाद द्यावे, असे नमुद केले.
यावेळी लातूर जिल्हा सोनार समाज, माता कल्याणी नवरात्र महोत्सव मंडळाच्या वतीनेही विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांचा सत्कार करण्यात आला. सुत्रसंचालन प्रा. श्रीहरी वेदपाठक यांनी केले. यावेळी भाविक, भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.