देशात काँग्रेस इंडिया आघाडीचे सरकार आल्यावर जातीनिहाय जनगणना केली जाणार – आ. अमित विलासराव देशमुख
माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख
यांच्या प्रमुख उपस्थितीत ओबीसी पदाधिकारी मेळावा संपन्न
लातुर प्रतिनिधी : दि. १७ एप्रिल २०२४
देशातील लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसने दिलेल्या गॅरंटी कार्डची अंमलबजावणी कर्नाटक, तेलंगणात या काँग्रेसशासीत राज्यात चालू आहे. भाजपने गेल्या दहा वर्षात शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले नाहीत, परंतु उद्योगपतींचे १६ लाख कोटी रुपयाची कर्ज माफ केले. शेतकऱ्यांच दुप्पट उत्पन्न करतो म्हणाले, शेती मालाला हमीभाव देतो म्हणाले, पण त्यांनी असे काही केले नाही. शेतीमालाला हमीभाव भाजपने न दिल्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले, देशात काँग्रेस इंडिया आघाडीचे सरकार आल्यावर जातीनिहाय जनगणना केली जाणार आहे, असे माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुखयांनी म्हटले आहे.