लातूर दि.१६- शेतकऱ्यांच्या मुलांनी उद्योग व्यवसायात आले पाहिजे हॉटेल व्यवसायात उत्कृष्ट आणि दर्जेदार जेवण मिळाले तर जेवणासाठी माणसे कुठूनही येतात, लाईन लावून जेवणाचा आनंद घेतील. चव, दर्जा, तत्परता आणि उत्कृष्ट सेवा यावरच हॉटेल व्यवसायाचे यश अवलंबून आहे असे प्रतिपादन भाजपा नेते आ. रमेशअप्पा कराड यांनी केले.
लातूर शहरापासून जवळच असलेल्या मौजे तांदूळवाडी येथे कळंब रोडवर प्रदीप सोट पाटील यांनी नव्याने सुरू केलेल्या हॉटेल यश अँड रेस्टॉरंट या हॉटेल व्यवसायाचा शुभारंभ भाजपाचे नेते आ. रमेशआप्पा कराड यांच्या शुभहस्ते १५ ऑक्टोबर रविवार रोजी सायंकाळी करण्यात आला. याप्रसंगी लातूरचे माजी महापौर विक्रांत गोजमगुडे, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस विक्रमकाका शिंदे, लातूर तालुका अध्यक्ष बन्सी भिसे, सांगायो समितीचे अध्यक्ष वैभव सापसोड, अँड सिद्धेश्वर धायगुडे, गोपाळ पाटील, सुधाकर गवळी, विश्वास चामे, दौलत कोदरे, सचिन हाके, प्रशांत शिंदे, ईश्वर बुलबुले, मारुती शिंदे यांच्यासह अनेकांची प्रमुख उपस्थिती होती.
घरच्या माय माऊलीच्या हाताची चव हॉटेलच्या जेवणात मिळत नाही मात्र सध्या शहराबरोबरच ग्रामीण भागातील अनेकांची हॉटेलात जेवण्याची फॅशन झाली आहे. निश्चितपणे कधीतरी बाहेर जेवायला हरकत नाही असे सांगून आ रमेशआप्पा कराड म्हणाले की, चवीतून मने जिंकली तर यश हमखास मिळते. यश हॉटेल माध्यमातून ग्राहकांना चव, दर्जा आणि उत्कृष्ट सेवा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करून निश्चितपणे सोट परिवाराने सुरू केलेला व्यवसाय प्रगती करेल अशा सदिच्छा दिल्या.
यावेळी बोलताना माजी महापौर विक्रांत गोजममुंडे यांनी हॉटेल व्यवसाय सुरू करून सोट परिवाराने धाडसी पाऊल टाकले असल्याचे सांगून ग्रामीण भागातील जनतेला शहरातील सुविधा देऊन यश हॉटेल यशस्वी होईल अशा शुभेच्छा दिल्या प्रारंभी भागवत सोट पाटील यांनी प्रास्ताविक केले.
उपस्थित सर्व मान्यवरांचे भागवत सोट, गोपाळ सोट, प्रशांत सोट, नागनाथ कोदरे, साहेबराव सोट, कुंडलिक सोट, सुभाष पवार, बाबुराव कोदरे, जगन्नाथ पवार, दत्ता सोट, ईश्वर गोमचाळे, राहुल सूळ, पंकज देशमुख, बालाजी पांचाळ, गोपाळ सोट, श्याम पवार आदींनी स्वागत केले या कार्यक्रमास तांदुळवाडीसह आजूबाजूच्या गावातील सर्व स्तरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.